महाभारत आणि श्रीमद्भागवत या दोन्हींचे रचनाकार व्यास मुनी आहेत. महाभारतात युद्धाचे, भागवतात भक्ती आणि शांत रसाचे वर्णन आहे. यातील कथेत माणूस रमतो, पण चमत्कारात न गुंतता त्याचे सार काय आहे समजून घेणे आवश्यक आहे, असा विचार मांडत डॉ. वृषाली पटवर्धन यांनी ‘नाथ-भागवत’मधून त्यातील सारसंग्रह वाचकांपुढे ठेवला आहे. यातील एकेका अध्यायातील श्लोकाचा नेमका सत्यार्थ लेखिकेने सांगितला आहे.
परमेश्वर, भक्ती, वैराग्य याचे अर्थ उलगडल्यानंतर भागवत कथेला सुरुवात होते. भगवंतांच्या अवताराचे वर्णन, महर्षी व्यास यांचा असंतोष, देवर्षी नारायणाचे पूर्वचरित्र, अश्वत्थाम्याचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे, युधिष्ठिराचा शोक, भीष्मांचा प्राणत्याग, श्रीकृष्णाचे द्वारकेला गमन, परिक्षिताचा जन्म, धृतराष्ट्र व गांधारीचे वनात जाणे, पांडवांचे स्वर्गारोहण, राजा परीक्षितास शृंगी ऋषींचा शाप, शुकदेवांचे आगमन, शुकदेवांच्या कथेची सुरुवात, भगवंतांचे अवतार आदी कथांचे सारग्रहण यातून करता येते.
पुस्तक : नाथ भागवत
लेखक : डॉ. वृषाली पटवर्धन
प्रकाशक : आरंभ प्रकाशन
पाने : २९२
किंमत : ३०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)